पत्रकार परिषद घेत निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, विशेष म्हणजे शुक्रवारी (8 नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंनी अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असून या निकालाचे श्रेय कुणालाही घेता येणार नसल्याचं विधान करत भाजपला लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. न्यायदेवतेला या न्यायासाठी मी दंडवत करतो. आत्तापर्यंत आपण अनेक कथा ऐकत होतो. आता याचा निकाल लागला आहे.” दोघा ठाकरेंनी निर्णयाचे स्वागत केले आहे.