1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या

निकालानंतर शांतता पाळा- चिदंबरम

अयोध्येचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. अलाहाबाद न्यायालय हा निकाल जाहीर करणार असून, निकालानंतर देशवासीयांनी शांतता पाळावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे.

चिदंबरम निकालानंतर पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेण्‍याची शक्यता असून, यात ते शांततेचे आवाहन करण्‍याची शक्यता आहे.

निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जाता येणार असल्याने कोणत्याही पक्षाने हा निकाल अंतिम आहे असे मानू नये असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा