हिंदू जनमानसात अतिशय श्रद्धेचे स्थान असलेल्या राम सीता आणि लक्ष्मणाने त्यांच्या वनवास काळातील साडेअकरा वर्षांचा काळ चित्रकूट भागात व्यतीत केला असल्याचे मानले जाते. घनदाट अरणे, चित्रविचित्र आणि विपुल वृक्षसंपदा, तर्हे तर्हेची फुले फळे यामुळे नटलेला हा भाग कुणालाही सहज भुरळ घालेल यात नवल नाही. सती अनुसुया, अत्री ऋषी, दत्तात्रेय, महर्षी...