अर्जुन आणि मेहेर यांचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. ते वांद्रे येथील एका उच्चभ्रू इमारतीत मुली माहिका व मायरा यांच्यासोबत राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेथे राहत नसल्याचे समोर आले आहे. मेहेर हिच्या मनात पुन्हा अर्जुन आणि सुझानच्या नात्याविषयी संशयाची पाल चुकचुकली आहे. अर्जुनने अनेकदा समजावून देखील मेहेर त्याच्यावर संशय घेत असल्याने त्याने दोन आठवड्यांपूर्वी घर सोडल्याचे समजते.