संबंधित माहिती
- Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका
- ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला
- यशराज फिल्म्स चा प्रतिष्ठित चित्रपट 'वीर-ज़ारा' पुन्हा थिएटरमध्ये!
- Mardaani 3 मर्दानीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशराजची मोठी घोषणा, राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी 3' मध्ये दिसणार
- यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राणी मुखर्जीने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच केले"
राणी मुखर्जी यांना ब्रेक देणारे प्रसिद्ध बॉलीवुड निर्माता सलीम अख्तर यांचे निधन
प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले. मंगळवार, 8 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम अख्तर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला राजा की आयेगी बारात चित्रपटातून इंडस्ट्रीत आणले.
सलीम अख्तर यांनी अनेक मोठे सुपरहिट चित्रपट निर्माण केले आहेत. ज्यामध्ये 'चोर की बारात', 'कयामत', 'लोहा', 'बटवारा', 'फूल और अंगारे', 'बाजी', 'इज्जत' आणि 'बादल' या चित्रपटांचा समावेश आहे. राणी मुखर्जी व्यतिरिक्त, सलीम खानने तमन्ना भाटियालाही ब्रेक दिला.
सलीम अख्तर हे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले होते. सलीम जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते.अखेर आज रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. इंडस्ट्रीतील लोक त्याला त्याच्या साध्या आणि सरळ वागण्यामुळे ओळखत होते.
सलीम अख्तर यांनी 1980आणि 1990 च्या दशकात एक उत्कृष्ट निर्माता म्हणून काम केले. सलीम अख्तर यांनी त्यांच्या 'आफताब पिक्चर्स' या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली असे अनेक चित्रपट बनवले जे अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. राणी शिवाय सलीम अख्तरने 'चंदा सा रोशन चेहरा'मध्ये तमन्ना भाटियाला इंड्रस्टी मध्ये आणले होते.
बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
Edited By - Priya Dixit
