संबंधित माहिती
- कोरोनाः राज्यात लसीकरणाचा वेग मंदावण्याची 'ही' आहेत कारणं
- राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता
- जावेद अख्तर यांचे मोठे विधान, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल असण्याची किंमत मोजत आहे
- राज्यात 2,078 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Eid-e-Milad 2021: ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली
राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात बुधवारी २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, १ हजार ६३८ रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२०(१०.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
