Festival Posters

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एअर इंडियाने २०० वैमानिकांना कामावरून कमी केलं

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (08:33 IST)
लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातही डबघाईला आलेल्या एअर इंडियाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. यासाठी कंपनीने २०० वैमानिकांना कामावरून कमी केलं आहे. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट देखील रद्द केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे.
 
केंद्र सरकरने यापूर्वीच खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत. त्या पाठोपाठच राज्य सरकारने देखील देशांतर्गत विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक हवाई कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. तसंच उड्डाणे रद्द असल्याने एअर इंडियाच्या महसूलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपनीने २०० वैमानिकांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवृत्तीनंतर पुन्हा एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या वैमानिकांचा देखील समावेश आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या भरघोस संधी मिळतील

योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीचा वापर; पत्ताकोबी लागवडीची संपूर्ण माहिती

ITR Filing 2026: ३१ जुलैपर्यंत तुमचा रिटर्न दाखल न केल्यास ₹५,००० पर्यंत दंड होऊ शकतो

कामातील गंभीर अनियमितता आणि निष्काळजीपणानंतर एसटी महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू; बीएमसीचे चार अधिकारी निलंबित, नुकसान भरपाई जाहीर

पुढील लेख
Show comments