संबंधित माहिती
- पाकिस्तानाला प्रत्युत्तर, भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले सैन्याच्या चौका, दहशतवादी तळ
- रेल्वेकडून नॉन-एसी डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर
- राज्यात लष्कराची नियुक्ती करण्यात यावी, केंद्राकडे केली मागणी
- देशातल्या 100 रेल्वेमार्गांवर 150 खासगी रेल्वे धावणार
- भारतीय रेल्वेच्या आर्थिक दुरवस्थेला जबाबदार कोण?
रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर ने सुविधा उपलब्ध करून द्याव्या
मुंबईत अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.
केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रुग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल आदी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे. तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 6, 2020
