Marathi Biodata Maker

सुगंधी उटण्याचे काय फायदे आहे जाणून घ्या?

Updated: सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (08:10 IST)
 
पार्लरच्या महागड्या फॅशियल आणि क्लीनअपने मिळणारा तजेलपणा देखील या घरगुती उटण्यामुळे मिळवू शकता. या साठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार.
 
1 चमचा नारळाच्या दुधासह 1/4 चमचा हळद आणि थोडे  चंदन पावडर मिसळा. या पॅकने आपल्या त्वचेची मालीश करा. आणि याला 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने याला धुऊन घ्या. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद ही सर्वोत्तम मानली जाते. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, टॅन काढण्यासाठी आणि मुरुमांशी लढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. हे अँटी ऑक्सिडंटने भरपूर असतं. जे छिद्र स्वच्छ करून नैसर्गिक चमक देतं.
 
दूध किंवा पाण्यात बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची मऊ अशी पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. व्हिटॅमिन इ आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये भिजत टाकल्यानं आपल्या त्वचेच्या जटिलतेत सुधारणा होईल आणि त्वचा मऊ होईल त्याच सह चकाकी येते. त्वरितच चमक मिळविण्यासाठी हे एक सोपे पॅक आहे.
 
सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून त्याची भुकटी बनवा. आता या मध्ये चिमूटभर हळद आणि गरजेपुरतं पाणी घाला. तयार झालेल्या पेस्टला चेहऱ्यावर लावून काही काळ वाळू द्या आणि नंतर स्क्रब करत चेहऱ्याला हळुवार हाताने मालीश करा.
 
बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धुळ व माती तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका.
 
नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसेच मानेवर मॉलिश करून 5 मिनिटे वाफ घ्या. 
 
2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाबाचे पाणी, 1 चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल. 
 
यानंतर हाथ व पायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, 3 ते 4 थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय 10-15 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हाथ व पाय साध्या पाण्याने धुऊन मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील.  

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

श्री कुबेर आरती, ऊँ जै यक्ष कुबेर हरे स्वामी जै यक्ष जै यक्ष कुबेर हरे।

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments