Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक दूरसंचार दिन विशेष 2021 : जागतिक दूरसंचार दिन निबंध

Updated: सोमवार, 17 मे 2021 (09:02 IST)
याची सुरुवात 17 मे 1865 पासून सुरु झाली परंतु आधुनिक काळात याची सुरुवात 1969 पासून झाली तेव्हा पासून सम्पूर्ण जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. त्याच बरोबर नोव्हेंबर 2006 मध्ये तुर्की मध्ये पूर्ण झालेल्या परिषदेत जागतिक दूरसंचार आणि माहिती आणि सोसायटी हे तिन्ही एकत्रितपणे  साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
* टेलीफोन भारतात सुरू- 
1880 मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेड 'आणि' अँग्लो-इंडियन टेलिफोन कंपनी लिमिटेड ने भारतात टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करण्यासाठी भारत सरकारशी संपर्क साधला.टेलिफोन स्थापित करणे ही सरकारची मक्तेदारी आहे व सरकारच हे काम सुरू करेल या कारणावरून ही परवानगी नाकारली गेली. 1881 मध्ये सरकारने आपल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन इंग्लॅण्डच्या ओरिएंटल कंपनी लिमिटेड ला कोलकाता,मुंबई,चेन्नई आणि अहमदाबाद मध्ये टेलिफोन एक्सचेन्ज सुरु करण्यासाठी लायसेन्स देण्यात आले. 1881 मध्ये देशात पहिली औपचारिक टेलिफोन देव स्थापन झाली. 28 जानेवारीभारताच्या टेलिफोन इतिहासामध्ये 'रेड लेटर डे' आहे. या दिवशी भारतीय परिषदेचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मेजर ई. बेरिंग यांनी कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्याची घोषणा केली. कोलकाता एक्सचेन्ज ला सेंट्रल एक्सचेन्ज असे नाव देण्यात आले. या सेंट्रल एक्सचेन्जचे सुमारे 93  ग्राहक होते. मुंबईत देखील 1882 मध्ये अशाच एका टेलिफोन एक्सचेन्ज चे उदघाटन करण्यात आले.
 
इंटरनेटचे महत्त्व-
सध्या दूरसंचारचा  एक महत्त्वाचा भाग इंटरनेट आहे. जे लोक या इंटरनेट चा एक भाग आहे त्यांच्या जीवनाला कलाटणी आली आहे. इंटरनेट ने त्या लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. कोणतीही सूचना आपण काहीच सेकंदातच मिळवून घेतो. इंटरनेट हे सोशल नेटवर्किंग पासून ते स्टॉक  एक्सचेंज, बँकिंग, ई-शॉपिंग इत्यादीसाठी महत्त्वाचे आहे. या साठी सर्व श्रेय गुगल सारख्या सर्च इंजिनला दिले जावे. गुगल मुळे हजारो किलोमीटर दूर असलेली व्यक्ती चॅटिंग,व्हिडीओ,व्हॉइस चॅटिंग द्वारे काही सेकंदातच जवळ आलेली जाणवते आणि ही दुरी आता काहीच सेकंदावर कमी केली गेली आहे.   
 
ज्या प्रकारे इंटरनेट ने आपले जीवन सहज केले आहे तर आव्हाने देखील समोर आणून ठेवले आहे. आज इंटरनेटवरील काम कमी आहे आणि त्याचा अधिक गैरवापर केला जात आहे. पोर्नोग्राफीसारख्या समस्या इंटरनेटच्या प्रत्येक भागात पोहोचल्या आहेत.सायबर गुन्हेगारी, वाढतच आहे. या सर्व नकारात्मक गोष्टी असूनही, आज भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान समृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे.या क्षेत्रातील सतत होणाऱ्या बऱ्याच विकासाचा परिणाम म्हणून अनेक तरुण चांगले करिअरचे स्वप्न घेऊन या क्षेत्रात पुढे येत आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करायची? कॉफी Ice Cubes ठरतील फायदेशीर

पावसाळी आजारांपासून बचाव करा! ही धोकादायक लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

आकाश मुद्रा योग केल्याचे १४ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : गोष्ट खार, वेळ आणि अक्रोडची

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

पुढील लेख
Show comments