गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच तंत्र शास्त्रात काही अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना पाण्यात मिसळल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते आणि आयुष्य देखील वाढत. 
  
पाण्यात वेलची किंवा केशर घालून अंघोळ करा. याने आर्थिक तंगी दूर होते.  
 
पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने शक्ती मिळते. तसेच आयुष्य देखील वाढत.   
 
पाण्यात रत्न घालून स्नान केल्याने दागिन्यांची प्राप्ती होते.  
 
त्या शिवाय पाण्यात तीळ घालून स्नान करावे. यामुळे व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.  
 
पाण्यात दही घालून अंघोळ केल्याने संपत्तीत वाढ होते.  
 
तुपाला पाण्यात घालून अंघोळ केल्याने आयुष्य वाढत व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
   
इत्र किंवा सुगंधित वस्तूंना पाण्यात घालून स्नान केल्याने आर्थिक तंगी दूर होते.