Dharma Sangrah

सहस्र वर्षांपूर्वी ऋषींचे आविष्कार, गुपित जाणून व्हाल हैराण

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (15:21 IST)
 
5 भारद्वाज 
आधुनिक विज्ञानानुसार राईट बंधूंनी वायुयानाचा शोध लावला असे विदित असे. तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अनेक शतकांपूर्वी ऋषी भारद्वाज यांनी विमानशास्त्राच्या माध्यमाने विमानाला लुप्त करण्याचा विचारांपासून ते विमान एका ग्रह पासून ते दुसऱ्या ग्रहापर्यंत तसेच एका जगातून दुसऱ्या जगात नेण्याचे रहस्य उलगडले. अश्या प्रकारे ऋषी भारद्वाज हे वायुयानचे शोधकर्ता मानले जातात.
 
6 ऋषी कण्व 
वैदिक काळात ऋषींमध्ये ऋषी कण्व यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांच्या आश्रमातच राजा दुष्यन्तची बायको आणि त्यांचा मुलगा भरताचे संगोपन झाले असे. अशी आख्यायिका आहे की या भरताच्या नावावरच आपल्या देशाचे नाव झाले असे. सोमयज्ञची परंपरा ही देखील ऋषी कण्व यांचीच देणगी असे.
 
7 कपिल मुनी 
हे भगवान विष्णूंचे 5 वे अवतार मानले जातात. ह्यांचे वडील कर्दम ऋषी असे. ह्यांचा आईची देवाहुतीची इच्छा विष्णूंसारखा मुलगा आपल्यालाही हवा अशी होती. म्हणूनच त्यांच्या इच्छेचा मान राखून भगवान विष्णूंनी त्यांचा पोटी जन्म घेतला. कपिल मुनी हे 'सांख्य दर्शन' चे प्रवर्तक मानले जातात. ह्यांचा संदर्भात एक घटना अशी आहे- ज्या वेळी ह्यांचे वडील कर्दम संन्यास घेण्यासाठी अरण्यात जाऊ लागले त्यावेळी देवहूती एकटेपणाच्या जाणिवेपोटी दुखी झाली. अश्या वेळी ऋषी कर्दमानी देवाहुतीला आपल्या मुलांपासून ज्ञान मिळविण्याबद्दल सांगितले हेच ते ज्ञान सांख्य दर्शन होय.
 
त्याच प्रकारे पवित्र गंगेच्या पृथ्वीवर अवतरणाच्या मागे कपिल मुनींचा श्राप जगासाठी फायदेशीर ठरला. या मागे एक घटना आहे. भगवान श्रीरामाच्या पूर्वज सागर यांच्या यज्ञाचं घोडं इंद्रदेव चोरतात आणि कपिल मुनींच्या आश्रमाजवळ सोडतात. घोड्याचा शोध करीत असताना राजा सागरची 60 हजार मुलं कपिल मुनींच्या आश्रमात येतात आणि त्यांच्यावर चोरी करण्याचा आळ घेतात. संतापून कपिल मुनी राजा सागराच्या सर्वांच मुलांना नष्ट करतात. नंतरच्या काळात राजा सागराचे वंशज भगीरथाने तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणतात आणि आपल्या पूर्वजांना शापपासून मुक्त करतात.
 
8 पतंजली 
आताच्या आधुनिक काळात जीवघेण्या आजारांमध्ये कर्करोगाचे निदान आणि उपचार संभव आहेत. परंतु बऱ्याच शतकांपूर्वी ऋषी पतंजलीने कर्क रोग प्रतिबंधक योगशास्त्रांची रचना केली होती आणि योगामुळे देखील कर्करोग बरा होऊ शकतो हे सांगितले.
 
9 शौनक 
वैदिक आचार्य आणि ऋषी शौनक यांनी गुरुशिष्य परंपरेला वाव दिले आणि संस्कार पसरविले. त्यांनाच 10 सहस्र शिष्य असलेले गुरुकुलाच्या कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. शिष्यांचीही गणना अनेक आधुनिक विद्यापीठांच्या शिष्यांपेक्षा जास्त असे.
 
10 महर्षी सुश्रुत
हे शल्य चिकित्साचे पहिले चिकित्सक मानले जातात. शल्य क्रियेमध्ये हे दक्ष असे. यांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता ग्रंथात शस्त्रक्रिये विषयी अनेक महत्त्वपूर्ण ज्ञान विस्तृतपणे सांगण्यात आले आहे. या ग्रंथात सुई, सूरी, चिमट्यासारख्या तब्बल 125 हून जास्त शल्यचिकित्सेमध्ये वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांची माहिती दिली आहे. तसंच तब्बल 300 प्रकारांच्या शस्त्रक्रिया आणि त्यापूर्वीची केली जाणारी तयारीसाठी शस्त्र गरम पाण्यात उकळवणे या संदर्भात माहिती दिली असे. 
 
आधुनिक विज्ञानाने जवळपास 4 शतकांपूर्वी शस्त्रक्रियेचा शोध लावला होता. असे मानले जाते की महर्षी सुश्रुत मोतीबिंदू, मुतखडा, हाडांचे मोडणे, सारख्या वेदनांच्या उपचारासाठी शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ असे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्वचेला बदलण्याची शस्त्रक्रिया देखील केली असे. 
 
11 वशिष्ठ 
गुरु वशिष्ठ हे राजा दशरथाचे कुलगुरू होय. राजा दशरथाच्या 4 ही मुलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुध्न यांनी शिक्षणाचे धडे गुरुदेव वशिष्ठ कडूनच घेतले होते. देवप्राणी आणि इच्छित वर देणारी कामधेनू गाय ऋषी वशिष्ठांकडेच असे. 
 
12 विश्वामित्र 
ऋषी होण्याच्या आधी विश्वामित्र हे क्षत्रिय असे. ऋषी वशिष्ठांकडून कामधेनू गाय मिळविण्यासाठी केलेल्या युद्धात पराभव मिळाल्यावर ते तपस्वी झाले. त्यांनी भगवान शंकरापासून अस्त्रविद्या मिळवली. या संदर्भात असे म्हटले जाते की आजच्या आधुनिक युगात प्रचलित प्रक्षेपास्त्र (मिसाइल) प्रणालीचा शोध ह्यांनीच लावला होता. विश्वामित्र हे ब्रह्मा गायत्री मंत्राचे ज्ञाता मानले जाते. ह्यांचे मेनके वर आसक्त होऊन तपश्चर्या खंडित होण्याचे प्रकरण सुद्धा प्रसिद्ध आहे. विश्वामित्रानेच शरीरासह त्रिशंकूला स्वर्गात पाठविण्याचे चमत्कार आपल्या तपोबलाने केले होते.
 
13 महर्षी अगस्त्य 
वैदिक मान्यतेनुसार मित्र आणि वरून देवतांचे दिव्य तेज यज्ञ कलशात एकत्र झाल्याने त्या कलशातून एक तेजस्वी महर्षी अगस्त्य उत्त्पन्न झाले. हे कठोर तपस्वी होते त्यांच्या तपोबलाबद्दल सांगण्यामागची एक आख्यायिका असे की एकदा समुद्री राक्षसांना त्रासाला कंटाळून सर्व देव महर्षी अगस्त्य यांच्याकडे मदतीसाठी जातात. तर देवांना राक्षसांच्या त्रासापासून सोडविण्यासाठी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकतात, आणि सर्व राक्षसांचा नायनाट करतात. 
 
14 गर्ग मुनी
नक्षत्र आणि तारकांचे अन्वेषक गर्ग मुनी मानले जातात. त्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन बद्दल नक्षत्र विज्ञानावर आधारित जे काही सांगितले ते तंतोतंत खरं निघाले. कौरव आणि पांडवांमधील युद्ध विनाशकारी होते. या मागील कारण असे की युद्धाच्या पहिल्या पक्षामध्ये तिथीचे लोप असल्याने 13 व्या दिवशी अवस असे. तसेच दुसऱ्या पक्षांमध्ये पण तिथीचा लोप झाल्याने पौर्णिमा 14 व्या दिवशी आली आणि त्या दिवशी चंद्रग्रहण होता. तिथी नक्षत्रांची ही स्थिती आणि त्याचा निकाल गर्ग मुनींनी सांगितले असे.

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

Shree Gajanan Maharaj Punyatithi 2026 Vinmra Abhivadan संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments