Marathi Biodata Maker

श्री संतोषीमातेची कहाणी Shri Santoshi Mata Vrat Katha

Updated: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (10:13 IST)
 
ते ऐकून देवी म्हणाली, "मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. माझी प्रार्थना कर. तुपाचे निरांजन लाव. बघता-बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील."
 
देवीच्या स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे त्याने सर्व केले. दुसर्‍या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला. श्रीसंतोषीमातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवाहार पूण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्रीसंतोषीमातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळ आपल्या देशास निघाला.
 
तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्‍नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असता तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, "माते कोण येत आहे?"
 
देवी म्हणाली, "मुली, तुझा नवरा येत आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव. दुसरी नदीकिनार्‍यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवर्‍याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल, जेवण करील व मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण "सासूबाई, सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"
 
देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. इतक्यात तिचा नवरा तेथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणी मोळी टाकून म्हणाले, "सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"
 
बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती, त्याला खूण पटली. तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती, ती त्याने ताब्यात घेतली.
 
खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणले व ते दोघे जण आनंदात तेथे राहून लागले, इतक्यात शुक्रवार आला. तिने नवर्‍याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाइकांना जेवायला बोलविले, जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की, काकूजवळ आंबट खायला मागा.
 
सर्वांची जेवणे झाल्यावर मुले म्हणली, "काकू, गोड-गोड खाऊन वीट आला. काहीतरी आंबट खायला दे."
 
त्यावर ती म्हणाली," बाळांनो हे श्रीसंतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तु खायला मिळणार नाही."
 
मुले जेवूण उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंचा, आवळे आणून खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवर्‍याला धरून नेले. ती रडत-रडत संतोषीमातेच्या मंदिरात गेली. नमस्कार करून ती म्हणाली, " माते, तू काय केलेस? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस?"
 
देवी म्हणाली, " मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे. पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चूक करू नकोस. जा आता."
 
त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, "मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे."
 
ते ऐकून तिला फार आनंद झाला ती दोघे घरी गेली. फिरून शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलाविले. मुले जेवायला आली; पण म्हणाली, "काकू, आम्हांला गोड खीर नको. काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी,"
 
"आंबटचिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा. नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही." तिने सांगितले.
 
मुले निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले. अशा तर्‍हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. व्रत यथासांग पुरे झाले. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपुल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे.
 
एके दिवशी देवीच्या मनात आले की, आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू, दीर, जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने अक्राळविक्राळ रूप घेतले. काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे-मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंघावताहेत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबताहेत, कपड्याच्या चिंध्या, आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे, अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेली. तिला पाहून सासूची बोबडीच वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, "धावा, धावा, मुलांनो धावा. कोणी पिशाच्च, डाकीण, शाकीण घरात येते आहे. तिला हाकलून लावा. नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार."
 
तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे, खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, "आज माझी आई माझ्याकडे येत आहे."
 
असे म्हणत असताच तिने अंगावर पीत असलेला आपल्या मुलाला बाजुला ठेवले आणी ती घरभर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली, तिला वाटेल ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली, सून म्हाणाली, "सासूबाई, घरात येत आहे ती कोणी डाकीण किंवा पिशाच नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे."
 
असे म्हणून तिने सर्व दरवाजे, खिडक्या उघडल्या. श्रीसंतोषीमाता घरात आली. सर्व जण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. " हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत. अज्ञानी आहो, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हांला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणूनबुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. माते, आम्हांला क्षमा कर. आमच्यावर दया कर."
 
याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्रीसंतोषीमातेचे वरदान मिळाले तसे वरदान ही कहाणी ऐकणारालाही मिळो.

सर्व पहा

लग्नापूर्वी हळद का लावली जाते? या विधीचा खरा अर्थ जाणून घ्या

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments