Dharma Sangrah

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २०

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:55 IST)
 
मारुतीने पद्मिणीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीहि खरकन उतरून गेली. तेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला. तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याहि श्रवणी तसाच आवाज पडला, मग तिने कलावंतीणीस सांगितले की, आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पाहा. त्यावरून तिने तो वाजविला असताहि तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंतीण वाजवावयास पाठविली. पण तिला 'चलो मच्छिंदर गोरख आया' हे शब्द काढता येईनात; तेव्हा त्या स्त्रीवेषधार्‍याला (गोरक्षाला) मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरूची शपथ घातली. तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की, मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्रीवेष घेतला आहे. ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली. मग रत्‍नखचित अलंकार व पुरुषांची ऊंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने स्त्रीवेष टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्यास सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तेथे तिने मच्छिंद्रनाथास खूणेने इषारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे. प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे ! ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवील. हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेहि उत्तम संगोपन करील.
 
अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला. परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले. तो तिला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव लोक; आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यतः म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिणी जसे वागवील तसे वागण्याचा त्याने बेत केला, नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिणीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला.
 
नंतर गुरूने शिष्यास नवल वर्तमान विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हास सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही, म्हणून सांगितले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथानेहि त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की, तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे, पण काय करू? न घडावे त घडून आले. मला मारुतीने गोवून येथे आणून घातले. पण तुझ्यावाचून मला येथे चैन पडत नाही. अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की, तुमचे शिष्य अनेक आहेत. तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल, त्या योगाने तुमची माया सर्वाठायी वाटली जाईल, पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात,म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर. जशी माशांना उदकावाचून गति नाही, तद्वत माझा सर्व आधार कायय तो तुम्हीच ! असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती. मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले. त्या वेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली. नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली. दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसर्‍या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले.

सर्व पहा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

इंदूरमधील ऐतिहासिक पंढरीनाथ मंदिर आणि आषाढी एकादशीची परंपरा

आषाढ पौर्णिमेलाच का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा? जाणून घ्या महर्षी व्यास आणि गुरु परंपरेचा इतिहास

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments