शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By सौ. कमल जोशी|

वासना

वासना
मनाला भगवंत पेमाने पल्लवित करा, मन भरून जाईल व जीवन तरून जाई

वासनेला कितीही भोग प्रदान करा ती कधी तृप्त होणार नाही. अग्नीमध्ये तुपाची आहुती दिली तर अग्नी भडकतोच त्या प्रमाणे भोग भोगल्याने वासनाही भडकतेच. विवेक आणि वैराग्याने वासना शान्त होते. अग्नीत लाकडे टाकत जावे तो पर्यंन्त विस्तव जळतच राहातो. लाकडे टाकणे बंद केले की आग आपोआप विझते. त्याप्रमाणे वसना तृप्त करण्यास भोग भोगले की वासना वाढतच जाते. भोग भोगणे बंद केले की वासना शान्त होते, म्हणून विवेक आणि वैराग्याने वासना शान्त करण्याचा संकल्प आता पासूनच करा.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)

अनुवादकः सौ. कमल जोशी