Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील हजारो कर्मचारी चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने होणार बेरोजगार

Updated: मंगळवार, 30 जून 2020 (14:26 IST)
 
केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. 
 
त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय (59 app got banned in India) घेतला. मात्र या बंदीनंतर या कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो भारतीय बेरोजगार होण्याची चिन्ह दिसत आहेत.
 
भारत सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीमध्ये केवळ मोजकी अ‍ॅपही प्रचंड लोकप्रिय होती. बंदी घालण्यात आलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्सपैकी भारतात असणाऱ्या शाखांमध्ये केवळ १० ते १२ लोकं काम करायची. या ५९ पैकी बहुतांश कंपन्या भारतामध्ये अगदी अल्प मनुष्यबळाच्या मदतीने काम करत होत्या. 
 
मात्र याच यादीमधील १० ते १५ कंपन्यांवर प्रत्येकी ४०० ते ५०० लोकांचा रोजगार अवलंबून होता. बंदी घालण्यात आलेल्या टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउजर, हॅलो, बिग लाइव, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल झिओमी आणि विसिंक असे काही अ‍ॅप्स आहेत जे भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 
 
यापैकी अनेक कंपन्यांमध्ये १० ते १२ हून अधिक जण काम करतात त्यामुळे या कंपन्यानी भारतामधून गाशा गुंडळल्यास अंदाजे १० ते १२ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडेल. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments