1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
  4. This place in Maharashtra is special for sunrise and sunset

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

sunrise
Maharashtra Tourism : भारतात अनेक पर्यटनस्थळे आहे जे अद्भुत आणि रमणीय आहे. तसेच भारतातील सुंदर राज्यांपैकी एक असलेले महाराष्ट्र हे एक अतिशय अद्भुत आणि रमणीय तर आहेच पण त्याबरोबर इतिहासाचा देखील वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे.तसेच  मुंबई, पुणे, महाबळेश्वर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशी अनेक प्रसिद्ध शहरे आहे ज्यांचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
 
तसेच महाराष्ट्रात दरवर्षी देश-विदेशातून लोक भेट देण्यासाठी येतात. तसेच निसर्ग जवळून अनुभवायचा असेल, तर तुम्ही देखील महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणी सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याचा आनंद घेऊ शकता. सकाळ संध्याकाळी या ठिकाणांचे दृश्य अगदी मनाला भुरळ पाडणारे आहे.
 
महाबळेश्वर- 
महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांपैकी एक असलेले महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ असून येथील सुंदर दऱ्या आणि सुंदर दृश्ये जगभर प्रसिद्ध आहे. तसेच तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदयाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तसेच हिवाळ्यात सूर्योदय आणि सूर्यास्त अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.  
 
लोणार सरोवर- 
जर तुम्हाला महाराष्ट्रात सूर्यास्त आणि सूर्योदयाचा आनंद घ्यायचा असेल, तर लोणार सरोवर हे एक उत्तम ठिकाण आहे. असे मानले जाते की सुमारे एक हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे येथे सुंदर तलाव तयार झाले होते. या सरोवराचा रंग बदलतो असेही म्हणतात. तसेच येथील सूर्योदय आणि सूर्यास्त मनाला भुरळ पडणारे आहे. निसर्गाच्या सौंदर्याचे अद्भुत दर्शन इथे घडते. 
 
माथेरान- 
महाराष्ट्राचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. माथेरानची हिरवळ लोकांना स्वतःकडे आकर्षित करते. इथे येणं आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणं हा खूप वेगळा अनुभव असतो. ज्याचा तुम्ही वीकेंडलाही आनंद घेऊ शकता.
 
दादर बीच- 
सर्वात सुंदर आणि नयनरम्य ठिकाण म्हणजे दादर बीच. जिथे जाऊन तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदयाचे रंगीत दृश्य पाहू शकता. या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये सूर्य पाहणे ही एक अनोखी अनुभूती आहे. सकाळ संध्याकाळ या ठिकाणचे सौंदर्य द्विगुणित होते.
पुढील लेख
'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर अनुष्काचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले