गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By

बॉम्‍बेहून कशा प्रकारे वेगळे झाले महाराष्ट्र आणि गुजरात

पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. दोन्ही एकच प्रदेश बॉम्‍बे याचा भाग होते. त्यावेळी बॉम्‍बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषा बोलणार्‍यांची संख्या अधिक होती. नंतर भाषेच्या आधारावर वेगळं राज्य व्हावे याची मागणी व्हायला लागली. गुजराती वेगळं राज्य इच्छित होते आणि मराठी वेगळ्या राज्यांची मागणी करू लागले होते.
 
खरं म्हणजे, राज्‍य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत अनेक राज्य गठित केले गेले होते. या अंतर्गत कन्नड बोलणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्‍य, आणि तेलुगू बोलणार्‍यांसाठी आंध्र प्रदेश राज्य गठित करण्यात आले होते. या प्रकारेच मल्ल्याळम भाषिकांना केरळ आणि तमिळ भाषिकांसाठी तामिळनाडूची निर्मिती केली गेली. परंतू मराठी आणि गुजराती भाषिकांना वेगळे राज्य मिळाले नव्हते. म्हणून मागणी करण्यात आली.
 
वर्ष 1960 मध्ये पृथक गुजरातची मागणी करत महा गुजरात आंदोलन करण्यात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र समिती गठित करून महाराष्ट्र राज्याची मागणी व्हाल लागली. नंतर 1 मे 1960 मध्ये भारताच्या तत्कालीन नेहरू सरकार बॉम्‍बे प्रदेशाला दोन राज्यांमध्ये वाटले- महाराष्ट्र आणि गुजरात. 
 
प्रकरण येथे शांत झाले नाही आता दोन्ही राज्यांमध्ये बॉम्‍बे यावरून भांडण सुरू झाले. मराठी बॉम्‍बे ठेवू बघत होते कारण तिथे अनेक लोक मराठी भाषा बोलायचे तर प्रदेशाच्या प्रगतीत योगदान असल्याचे गुजराती म्हणत होते. शेवटी बॉम्‍बेला महाराष्ट्राची राजधानी घोषित केले गेले.