Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ

Updated: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (17:07 IST)
 
3 बटाट्याचे चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्या ऐवजी, कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ वापरावं. ह्याला आपल्या चवीप्रमाणे तिखट किंवा गोड बनवता येतं. यासह आपण काही फळ किंवा काकडी घेऊ शकता. 
 
4 बटाट्यांचा जास्त वापर करण्याऐवजी आपण दह्यात कुट्टुचे पीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे घालून आमटी बनवू शकता. हे चविष्ट आणि आरोग्यासाठी चांगली असते. 
यापासून गॅस आणि पोटाच्या अन्य त्रासांना रोखता येईल.
 
5 कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाची पुरी बनविण्याऐवजी आपण ह्याची पोळी देखील बनवू शकता. हे आरोग्यास जास्त फायदेशीर असणार.
 
6 उपवासात आपण साबुदाण्याची खिचडी बनवून खात असल्यास, आणि साबुदाणा आपल्यासाठी हानिप्रद असल्यास, आपण या सोबत दह्याचा वापर करू शकता. या पासून आपल्याला अतिरिक्त ऊर्जा मिळेल आणि दही पोटाच्या विकारांना दूर करण्यास मदत करेल. या मुळे पुन्हा-पुन्हा तहान पण लागणार नाही.
 
7 आपणास तळकट आणि मसालेदार खावयाचे नसल्यास, तर आपण दूध आणि केळीने बनवलेले मिल्कशेक दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. या मुळे भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जा राहील.
 
8 फ्रुट रायता देखील आपली गरज पूर्ण करण्यास मदत करेल. दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार फळ आणि ड्राय फ्रुट्स घालून रायतं बनवू शकता. या मुळे आपल्याला ताकद आणि ऊर्जा मिळेल.
 
9 ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा आणि कॅलरी दोन्ही मिळेल. कमी प्रमाणात घेतल्याने देखील आपल्याला अजून काहीही खाण्याची गरज भासणार नाही.
 
10 आपल्याला जर काही पेय पदार्थच घ्यावयाचे असल्यास, कुट्टू आणि शिंगाड्याच्या पिठाची दूध घालून गोड कढी किंवा आमटी करू शकता. या व्यतिरिक्त रताळ्याच्या शिरा आणि उकळून घेतलेलं रताळं आपल्या शरीरास दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देण्यास मदत करतात.

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments