Festival Posters

नाफेडकडून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार

Updated: बुधवार, 24 मे 2023 (21:12 IST)
 
मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकऱ्यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडे तीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.आज मितीस शेतकऱ्यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.
 
खासदार हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मिळणारा कमी भाव यापुढे काही दिवस मिळत गेला तर कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत नोटीस जातील अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकाधिक भाव मिळण्यासाठी नाफेड मार्फत तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना वजा आदेश यावेळी खासदार गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिल्या. नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याची ग्वाही यावेळी नाफेडचे पठाडे यांनी दिल्या.
Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अण्णा हजारे यांचे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन तासांचे मौन आंदोलन झाले

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर आपले उपोषण संपवले

LIVE: पालघर पुरात एकाचा मृत्यू, १६ गावांचा संपर्क तुटला

हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासह अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला

पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश: कागदपत्र फुटीबाबतचा कायदा अधिक कठोर केला जाईल, मंत्रिमंडळ नवीन विधेयक आणणार

पुढील लेख
Show comments