संबंधित माहिती
- रेल्वेकडून नॉन-एसी डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर
- युद्धकाळातही रेल्वे बंद नव्हती यावरून गांभीर्य लक्षात घ्या, रेल्वेची कळकळीची विनंती
- भारतीय रेल्वेच्या आर्थिक दुरवस्थेला जबाबदार कोण?
- भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती दहा वर्षाच्या तुलनेत सर्वात खराब
- IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग कंपनीच्या शेअर्सविषयी जाणून घ्या
रेल्वे सेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु
जवळपास दोन महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे.
यातच पुढचं पाऊल टाकत रेल्वे मंत्रालयायकडून आरक्षण प्रणालीत करण्यात आलेले काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यात १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाकडून हे नवे नियम लागू करण्यात येणार असून, आरक्षित तिकिटांनीच प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी १२० दिवस आधी आगाऊ प्रवासी आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. यापूर्वी २२ मे पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
