1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (13:54 IST)

ENG vs IND: शेवटची कसोटी आजपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणार नाही

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही खेळ होणार नाही. पहिला दिवस न खेळण्याचे कारण कोरोना व्हायरस महामारी असल्याचे मानले जाते. 
 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही खेळ होणार नाही. कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पाचवा कसोटी सामना दोन दिवस पुढे ढकलण्याची सूचना केली. पण आयपीएलचे वेळापत्रक पाहता ईसीबीच्या या प्रस्तावास बीसीसीआय सहमत नाही. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळाच्या अनुपस्थितीबद्दल दिनेश कार्तिकने ट्विट करून देखील याची माहिती दिली होती.