शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (22:01 IST)

IND vs PAK: 8 ऑगस्ट रोजी आशिया चषकात भारताचा सामना पाकिस्तानशी होईल

आशिया कप 2022 मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला होऊ शकतो. या सामन्यात पाकिस्तानला हरवून टीम इंडियाला 2021 च्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. आशिया चषक 2022 चे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाऊ शकते, अशी अटकळ पूर्वी होती, परंतु आता ही स्पर्धा वेळापत्रकानुसार श्रीलंकेतच खेळवली जाईल. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डिसिल्वा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेलाही यासाठी पटवून दिले आहे. यावेळी आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे, कारण यानंतर टी-20 वर्ल्ड कपही आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आपले विजेतेपद राखण्यासाठी उतरेल. 27 ऑगस्टपासून मुख्य फेरीचे सामने सुरू होतील. त्याआधी पात्रता फेरी खेळली जाईल. 
 
2021 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता आणि या सामन्यात टीम इंडियाला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
आता टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने आशिया चषक 2022 च्या मुख्य फेरीसाठी आधीच जागा निश्चित केली आहे, परंतु एका संघाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही
 
पात्रता फेरीत यूएई, ओमान, नेपाळ आणि हाँगकाँग हे संघ भाग घेणार आहेत. येथील विजयी संघ मुख्य फेरीत प्रवेश करेल.