1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (23:20 IST)

IND vs SL : भारता कडून श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करून आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

IND Vs Srilanka
India vs Sri Lanka Asia Cup 2023 : आशिया कपच्या सुपर-4 फेरीत, भारतीय संघाने श्रीलंकेचा दुसऱ्या सामन्यात 41 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 172 धावांवर गारद झाला.
 
भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 49.1 षटकात 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 41.3 षटकांत 172 धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या. राहुलने 39 आणि किशनने 33 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या डावात ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक 42* धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने 41 धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.
 
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या. आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडियाला दुसऱ्यांदा पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि संपूर्ण संघ 49.1 षटकात 213 धावांवर बाद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर लोकेश राहुलने 39 धावांचे, इशान किशनने 33 धावांचे आणि अक्षर पटेलने 26 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच विकेट घेतल्या. तर चरित असलंकाने चार विकेट घेतल्या. शेवटची विकेट महिष तिक्षीनाच्या नावावर होती. भारताच्या सर्व 10 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी पाहता शार्दुल ठाकूरच्या जागी टीम इंडियाने अक्षर पटेलला संधी दिली. रोहित आणि गिलच्या जोडीने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये 65 धावा जोडल्या. रोहित आणि गिल यांच्यात 11.1 षटकात पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी झाली. 
 
गिलला क्लीन बॉलिंग करून ड्युनित वेलल्गेने ही भागीदारी तोडली. पुढच्याच षटकात त्याने विराट कोहलीलाही तीन धावांवर बाद केले आणि आपल्या तिसऱ्या षटकात वेलल्गेनेही रोहितला बोल्ड केले आणि टीम इंडिया अडचणीत आली. बाद होण्यापूर्वी रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. आशिया चषक स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावाही पूर्ण केल्या. हे त्याचे वनडेतील 51 वे अर्धशतक होते. 
 
भारताच्या 91 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर इशान किशन आणि लोकेश राहुलने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आणि टीम इंडियाची धावसंख्या 150 धावांच्या पुढे गेली. 39 धावांवर लोकेश राहुलला बाद करत वेललगेने भारताला चौथा धक्का दिला. काही वेळाने इशान किशनही 61 चेंडूत 33 धावांची झुंजार खेळी करत चरित असलंकाचा बळी ठरला. पुढचे षटक वेलाल्गेच्या स्पेलचे शेवटचे षटक होते आणि त्याने शेवटच्या चेंडूवर पाच धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेललागेने प्रथमच एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. 
 
रवींद्र जडेजाही 19 चेंडूत चार धावा काढून असलंकाचा बळी ठरला. त्यानंतर पाच धावांच्या स्कोअरवर असलंकाने बुमराहला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर कुलदीपही खाते न उघडताच बाद झाला. भारताने 186 धावांत नऊ विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत सिराज आणि अक्षर यांनी शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या 213 धावांपर्यंत नेली. मात्र, टीम इंडियाला या स्पर्धेत दुसऱ्यांदा पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि 49.1 षटकांत 213 धावा झाल्या. वेलालगेच्या पाच बळींशिवाय श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने चार बळी घेतले. महिष तिक्ष्णाला एक विकेट मिळाली. या डावात सर्व विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.
 
 


















Edited by - Priya Dixit