संबंधित माहिती
- IND vs AUS : तिसऱ्या T20I मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला
- IND vs AUS: तिसऱ्या T20 साठी भारताचा प्लेइंग इलेव्हन बदलणार
- IND vs AUS : दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया कडून पराभव
- IND vs AUS T20 : IND vs AUS दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा जाणून घ्या
- IND vs AUS : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने पराभव केला
4th T20: भारताचा दमदार विजय
भारताने चौथ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी हरवले.
तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील चौथा सामना भारताने जिंकला. क्वीन्सलँडमध्ये खेळल्या गेलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी हरवले. यासह, भारतीय संघाने T20I मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. दुसरा सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. अक्षर पटेलला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अक्षरने २१ धावांची नाबाद खेळी केली आणि नंतर त्याच्या शानदार गोलंदाजीने त्याने ४ षटकांत फक्त २० धावा देऊन दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Edited By- Dhanashri Naik
