संबंधित माहिती
- Ranji Trophy 2022-23: अजिंक्य रहाणेने दुहेरी शतक झळकावले
- आयपीएलची मक्तेदारी भारतीय संघाला भोवतेय का?
- Womens T-20 World cup भारतीय संघ ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये; स्मृती मन्धानाची वेगवान खेळी
- Ranji Trophy 2023: कधीकाळी लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीवर नाव कसं कोरलं
- IND vs AUS: विराट कोहलीने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला
टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ अडकला वादात
टीम इंडियासाठी कसोटी आणि वनडे खेळलेल्या पृथ्वी शॉची नुकतीच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत निवड झाली. पृथ्वी खूप चांगल्या फॉर्ममधून जात आहे आणि त्याने रणजीमध्ये इतकी चांगली कामगिरी केली आहे की त्याला पुन्हा टीम इंडियामध्ये निवडावे लागले. मात्र तो एकही सामना खेळू शकला नाही. सध्या पृथ्वी शॉ क्रिकेटमुळे नाही तर आणखी काही वादात सापडला आहे. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत भांडत आहे.
सुरुवातीला पृथ्वी शॉच्या मित्राच्या (आशिष यादव) गाडीवर हल्ला करण्यात आला आणि दोघांनी हल्ला केल्याचे तपासात सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस काहीही बोलण्याचे टाळत असल्याचे दिसत आहे. पण पृथ्वी शॉने मुलीशी छेडछाड केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरून भांडण झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे संपूर्ण प्रकरण लोटसच्या पेट्रोल पंपाजवळील जोगेश्वरी लिंक रोडशी संबंधित आहे. पृथ्वीच्या मित्राने आणखी एक निवेदन दिले, त्याने सांगितले की, पृथ्वी त्याच्यासोबत नव्हता, तर तो दुसऱ्या वाहनाने आला होता. मी (पृथ्वीचा मित्र) कारमध्ये असताना आम्हाला पांढऱ्या रंगाची कार दिसली आणि तीन बाईक आमच्या मागे येत होत्या.
त्यांनी हाणामारी सुरू केली आणि नंतर प्रकरण दाबायचे असेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप पृथ्वीच्या मित्राने केला. तुम्ही असे न केल्यास ते तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवतील. पृथ्वीचे मित्र तुटलेल्या काचेच्या गाडीसह ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचतात. पोलिसांनी आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 384,143, 148,149, 427,504, आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून आता त्याचा तपास सुरू केला आहे. आता कोण खरे बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
