संबंधित माहिती
- सुनील गावस्कर जन्मानंतर नजरचुकीने अदलाबदली होऊन एका कोळिणीच्या घरी पोहोचले आणि
- Sunil Gavaskar B'day : जेव्हा सुनील गावसकर यांनी सामन्यादरम्यान पंचांकडून केस कापून घेतले होते
- Sourav Ganguly Birthday: कर्णधारपद गेले, संघाबाहेर, सौरव गांगुलीच्या एका चुकीने त्याचे करिअर कसे उद्ध्वस्त केले
- Tamim Iqbal : विश्वचषकाच्या तीन महिन्यांपूर्वी तमीम इक्बाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- ICC World Cup 2023 venues Controversy: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्थळावरून राजकारण पेटलं
World Cup: रोहित शर्माच्या कर्णधारपदावर गावस्कर नाराज
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर खूश नसून मला त्याच्याकडून अधिक अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विराट कोहलीच्या जागी रोहितला भारताचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, रोहित कर्णधार झाल्यानंतरही भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्येही टीमला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
गावसकर म्हणाले , संघातील खेळाडूंमध्ये मैत्रीचा अभाव निराशाजनक आहे आणि यामुळेच संघ चांगली कामगिरी करायला कमी पडू शकतो.
गावस्कर म्हणाले- मला रोहितकडून जास्त अपेक्षा होत्या. भारतात कसोटी खेळणे ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा तुमची कसोटी परदेशात असते. तिथे चांगली कामगिरी केल्याबद्दल तुमचे कौतुक होत आहे. रोहितची टीम इंडियाची परदेशात कामगिरी थोडी निराशाजनक झाली आहे. T20 फॉरमॅटमध्येही रोहितला आयपीएलचा सर्व अनुभव, कर्णधार म्हणून शतके आणि आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळूनही संघाला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही, ही निराशाजनक बाब आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी मोठ्या स्पर्धेमध्ये कमी पडली आहे. गेल्या वर्षी आशिया चषकात भारत टॉप 4 मधून पराभूत झाला होता आणि त्या नंतर T20 वर्ल्ड कप सेमीफायनल मधून देखील भारत पराभूत होऊन बाहेर पडला होता. आता देखील आस्ट्रेलियाकडून डब्ल्यूटीसी च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला.
डब्ल्यूटीसी फायनलसारख्या हाय-प्रोफाइल पराभवाच्या बाबतीत रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार धरले पाहिजे, असेही गावस्कर म्हणाले. गावस्कर म्हणाले - त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रथम क्षेत्ररक्षण का केले? नाणेफेक, ढगाळ आणि सर्व काही स्वच्छ होते. मग प्रश्न असा असावा की ट्रॅव्हिस हेडच्या शॉर्ट बॉलच्या कमकुवतपणाबद्दल तुम्हाला का कळले नाही? त्याने 80 धावा केल्या असताना तुम्ही बाउन्सर का टाकला?या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदी तमाम क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्न निर्माण होत आहे.
आता रोहित आणि द्रविड यांच्यावर यंदाच्या विश्वचषकात भारताला ट्रॉफी मिळवून देण्याची जबाबदारी असेल. एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पहिला सामना खेळणार आहे. तर, संघाचा पाकिस्तानशी हाय व्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आहे. भारतीय संघ नऊ मैदानांवर वेगवेगळ्या संघांसोबत राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
Edited by - Priya Dixit
