युद्धाच्या वेळी पंतप्रधानांच्या विनंतीवरून संपूर्ण देशाने उपवास सुरू केला, लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील ती आठवण
Memories of the life of Lal Bahadur Shastri: पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर १९६४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणारे भारताचे दुसरे पंतप्रधान आणि 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे १९६६ रोजी निधन झाले होते. ते स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणासाठी ओळखले जायचे. तसेच १८ महिने त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करला होता. तसेच १९६६ मध्ये ताश्कंद येथे पाकिस्तानचे अध्यक्ष यांच्याशी युद्ध संपवण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर रात्री लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता.
लाल बहादूर शास्त्री यांचा कार्यकाळ खूपच कमी होता. त्यांनी कठीण काळात देशात सत्ता हाती घेतली आणि आव्हानांना धैर्याने तोंड दिले. तसेच लाल बहादूर शास्त्री जून १९६४ ते जानेवारी १९६६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. या काळात भारतात धान्याची मोठी टंचाई होती. भारत अन्नधान्यासाठी अमेरिकेवर अवलंबून होता. त्यावेळी १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले, परंतु सैनिकांसाठी अन्नाची समस्या होती. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सर्व देशवासीयांना एक वेळचे जेवण वगळण्याचे आवाहन केले होते. देशातील जनतेनेही हे आवाहन स्वीकारले. युद्धात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि येणाऱ्या काळात अन्नधान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण झाले. शास्त्रीजी एक साधे व्यक्ती होते आणि हे त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसून येत असे.
Edited By- Dhanashri Naik