भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस भारतात दरवर्षी 2 डिसेंबर रोजी मृतांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी साजरा केला
इतिहास आणि महत्त्व
१९८४ मध्ये २ आणि ३ डिसेंबरच्या मध्यरात्री शहरातील युनियन कार्बाइडच्या केमिकल प्लांटमधून इतर रसायनांसह मिथाइल आयसोसायनेट (MIC) नावाच्या विषारी रसायनाची गळती झाल्यामुळे भोपाळ वायू दुर्घटना घडली होती. भोपाळ गॅस दुर्घटनेत अकाली आणि निष्पापपणे जीव गमावलेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश
आज भारतातील अनेक राज्ये वायू प्रदूषणाने त्रस्त आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहे. तेथील मोठ्या कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराचा सार्वजनिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. या दिवसाचा उद्देश औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि प्रदूषण प्रतिबंधाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. मानवी निष्काळजीपणामुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. अशा परिस्थितीत, हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व आणखी वाढते.
प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम
प्रदूषणामुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहे. प्रदूषणाचा आरोग्यावर आधीच हानिकारक परिणाम होत आहे. लहान वयातच लोक दमा, धुळीची अॅलर्जी, फुफ्फुसांच्या समस्या, डोळ्यांची जळजळ आणि हृदयरोग यासारख्या आजारांना बळी पडत आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रदूषण देखील कर्करोग आणि दम्याचे एक प्रमुख कारण बनत आहे. WHO च्या मते, योग्य वेळी प्रदूषण नियंत्रित केल्यास आयुर्मान वाढू शकते.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे मुख्य उद्दिष्ट्ये
प्रदूषण नियंत्रण: हवा, पाणी आणि माती प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना आणि उद्योगांना जागरूक करणे.
औद्योगिक सुरक्षा: औद्योगिक अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासंबंधी नियम आणि पद्धतींची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देणे.
जनजागृती: प्रदूषणामुळे होणारे गंभीर आरोग्य धोके आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
सरकारी नियमांचे पालन: प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहित करणे.
हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की पर्यावरणाची सुरक्षितता आणि मानवी आरोग्य यांच्यात घनिष्ठ संबंध आहे आणि स्वच्छ व निरोगी भविष्यासाठी प्रदूषण नियंत्रण करणे किती महत्त्वाचे आहे.
या दिवशी होणारे उपक्रम:
शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, चर्चासत्र, पोस्टर स्पर्धा
स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण
प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती रॅली
सेमिनार, वेबिनार
तसेच "प्रदूषण कमी करणे हे फक्त सरकारचे किंवा उद्योगांचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे."
Edited By- Dhanashri Naik