शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

बोटं सांगतात कसे आहात आपण, जाणून घ्या 15 विशेष गोष्टी

हस्तरेषेत बोटांचे विशेष महत्त्व असतं. एखाद्या व्यक्तीच्या हाताचे गहन अध्ययनाद्वारे त्या व्यक्तीच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाविषयी सोप्यारीत्या सांगता येऊ शकतं. हस्तरेषा विज्ञानाद्वारे व्यक्तीचा एक्सरे काढला जाऊ शकतं असे म्हणणे चुकीचे नाही. तसेच बोटं लहान-मोठे, जाड-पातळ, वाकडे-तिकडे, गाठ नसलेले असे अनेक प्रकाराचे असतात. तर चला जाणून घ्या काही विशेष गोष्टी...
 
प्रत्येक बोट तीन भागात विभाजित असतं.
 
पहिल्या बोटाला तर्जनी, दुसर्‍याला मध्यमा, तिसर्‍याला अनामिका आणि चौथ्याला कनिष्ठा असे म्हटले जातं.
हे बोटं क्रमशः: बृहस्पती, शनी, सूर्य व बुध पर्वतांवर अवलंबून असतात.
 
प्रत्येक बोटाची वेगवेगळी परीक्षा घेतली जाते.
 
बोटांचे अग्र भाग शार्प असतील आणि बोटांमध्ये गाठ दिसत नसल्यास असे व्यक्ती कला, साहित्य प्रेमी आणि धार्मिक विचाराने पूर्ण असतात. यांच्यात काम करण्याची क्षमता कमी असते. सांसारिक दृष्ट्या हे बेकामी असतात.
 
ज्यांच्या बोटांची लांबी अधिक असते असे लोकं दुसर्‍यांच्या काम खूप हस्तक्षेप करतात.
 
लांब आणि पातळ बोटं असलेले व्यक्ती चतुर आणि राजकारणी असतात.
 
लहान बोटं असलेला व्यक्ती अधिक समजूतदार असतात.
 
खूपच लहान बोटं असलेला व्यक्ती सुस्त, स्वार्थी आणि क्रूर प्रवृत्तीचा असतो.
 
ज्या व्यक्तीचे पहिले बोट अर्थात अंगठ्या जवळीक बोट अधिक लांब असतं तो व्यक्ती हुकूमशहा अर्थात लोकांवर आपले विचार मांडणारा असतो.
 
बोटं मिळवल्यावर तर्जनी आणि मध्यमा यात भोक पडत असल्यास त्या व्यक्तीला वयाच्या 35 वर्षांपर्यंत पेश्याची कमी झेलावी लागते.
 
मध्यमा आणि अनामिका यांच्या भोक असल्यास व्यक्तीला जीवनातील मध्यम भागात धनाची कमी जाणवते.
अनामिका आणि कनिष्का यांच्यात भोक म्हातारपणी निर्धनतेचे सूचक आहे.
 
कनिष्ठा लहान किंवा वाकडी-तिकडी असल्यास व्यक्ती उतावळा आणि बेइमान असतो.