suvichar

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय

शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (17:12 IST)
मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.
 पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथ आम्ही काही उपाय सांगत आहोत.

1 आलं 
आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते.

2 हळद
दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते. 
 
 
 
3 ओवा आणि गूळ 
ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि  गूळ टाका आणि ते पाणी सकाळी अनोश्यापोटी घ्या असे केल्याने पाळी लवकर येते.
 
4 कच्ची पपई
कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल.
 
5 दूध- हळद
दुधात हळद टाकून काही आठवडे सेवन केल्याने देखील पाळी नियमित होते.
 
6 दालचिनी
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी नियमित होते.
 
7 बडीशेप 
एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या. हे नियमित केल्यास समस्या नाहीशी होईल.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

लहान मुलांना संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक जबरदस्त पर्याय Semolina Cheese Corn Appay Recipe

उष्माघाताचा त्रास झाला आहे? हे फळ खाल्ल्याने शरीराला मिळेल त्वरित आराम

एअरलाइन इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? MBA in Air Travel Management बद्दल सर्व काही जाणून घ्या

तजेलदार आणि चमकदार त्वचेसाठी किवीचा वापर करा; जाणून घ्या खास फायदे

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

पुढील लेख
Show comments