एक बाई देवाघरी गेल्या. घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली. तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली. थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."