बिरबलास तंबाखू खायची सवय होती. मात्र, बादशहा अकबरास ती सवय अजिबात नव्हती. एकदा बादशाह अकबर आणि बिरबल तंबाखूच्या शेताजवळून जात होते. शेतात एक गाढव गवत खाताना बघून अकबर बिरबलास म्हणाले- ‘बघ बिरबल, तंबाखू किती वाईट असते, हे गाढवदेखील तंबाखूला स्पर्श करीत नाही.’ तसा हजारजबाबी बिरबल लगेच उत्तरला-‘ होय महाराज, गाढव तंबाखू कधीच खात नाही.