दिवाळीच्या फराळाचे स्वयंपाक घरात चालले असता राधावाईंनी मुलास आगगाडी खेळण्यासाठी देऊन बाहेर जाण्यास सांगितले. पण थोड्याच वेळानेच चिंरजीवांची स्वारी आगगाडी लोटत लोटत स्वयंपाकघराच्या दारापर्यंत येऊ लागली. तेव्हा-
राधाबाई- आता इकडे कशाला आणली आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा! मुलगा- बाहेर कोठे जे? या स्टेशनावर आमची आगगाडी प्रवाशांचा फराळ होऊपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.