शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (15:30 IST)

वैवाहिक जीवनात आनंदाचे रंग भरायचे असतील तर आचार्य चाणक्यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवा

चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखाने भरलेले असते, त्यांनाही जीवनात यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीचे नाते हे या पृथ्वीवरील सर्वात मजबूत नात्यांपैकी एक आहे. 
 
हे नाते जितके मजबूत होईल तितकेच जीवन सोपे होईल. हे नाते सुधारण्यासाठी चाणक्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत.
 
प्रेम- चाणक्य नीतीनुसार प्रेम हा प्रत्येक नात्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. जेव्हा प्रेमाचा अभाव असतो तेव्हा जवळचे नातेही कमकुवत दिसू लागते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नसते, त्यांना नेहमीच यश मिळते. अशा लोकांवरही लक्ष्मीची कृपा राहते.
 
सर्मपण- चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात समर्पणाची भावना खूप महत्त्वाची असते. जोपर्यंत नात्यात समर्पणाची भावना येत नाही, तोपर्यंत या नात्यात गोडवा आणि ताकद येत नाही. समर्पण असते तेव्हा एकमेकांच्या उणिवाही सहज दूर होतात. त्यामुळे या नात्यात एकमेकांप्रती भक्तीची भावना कमी होता कामा नये.
 
आदर- चाणक्य नीतीनुसार वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दल आदर कमी नसावा. जेव्हा आदराचा अभाव असतो तेव्हा हे नाते कमकुवत होऊ लागते. चाणक्याच्या मते, प्रत्येक नात्याला प्रतिष्ठा आणि आदर असतो. हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. वैवाहिक जीवनात मान-सन्मान राहिला तर सुख-समृद्धी टिकून राहते.