Festival Posters

तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते?

Updated: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (13:12 IST)
 
अभ्यासादरम्यान असे दिसून आले, की नात्यामध्ये सतत दुरावा निर्माण होत जातो आणि शेवटी ब्रेक अप होत असते. मात्र, काही जोडपी ब्रेकअप झाल्यावरही पुन्हा जवळ येतात. यामुळे उदासीनता आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा त्रास होण्याची शक्यता बळावत असते. नात्याचा दुरुपयोग करणे, अतिशय कमी दर्जाचा संवाद आणि एकेकांमध्ये बांधिलकी नसणे यामुळे नात्यामधील गोडवा कमी होत जातो. अशाच नात्यामधून मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. ब्रेकअप करून पुन्हा एकत्र येणे हे प्रत्येकच जोडप्यासाठी धोक्याची घंटा असतेच असे नाही. खरे तर काही जोडप्यांना ब्रेकअपमुळे त्यांच्या नात्याचे महत्त्व कळत असते. यामुळे ते आपले नाते अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न करतात तसेच त्यांच्याधील बांधिलकी वाढत जाते, असे अेरिकेतील मिसोरी विापीठाच्या साहाय्यक प्राध्यापिका केल माँक यांनी सांगितले.
 
प्रेमाच्या नात्यात अडकलेल्या 500 प्रेमी युगलांवर संशोधन करण्यात आले. ब्रेकअप झाल्यानंतर जोडपी गरजेनुसार एकत्र येतात की व्यावहारिकपणे एकत्र येतात, या दोन बाबींना अनुसरून अभ्यास करण्यात आला.
 
संशोधनानुसार, कोणी फक्त आर्थिक गरजांसाठी नातेसंबंध जपत असतात तर कुणी जीवनाचा एक भाग म्हणून आपले नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, प्रेमामध्ये कुठलेही बंधन न ठेवता सर्पणाच्या भावनेने एकत्र येणे गरजेचे असते. सतत ब्रेकअप होत असलेल्यांनी आपले संबंध काय ठेवण्यासाठी किंवा सुरक्षितपणे त्याचा शेवट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर अगदीच प्रामाणिक असेल तर तो नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. नाही तर अगदी सुरक्षितपणे त्या नात्याचा शेवट करेल. प्रत्येक जोडीदाराच्या मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असेही माँक म्हणाल्या. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

पावसाळ्यात तुमच्या हेल्मेटला दुर्गंधी येत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा

जातक कथा : ढोलवादक आणि जंगलातील दरोडेखोर

आषाढ महिन्यात 'आखाड तळणे' म्हणजे काय? वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण जाणून घ्या

पावसाळ्यात या ५ भाज्या खरेदी करणे टाळा, आरोग्याच्या समस्या टाळा

पुढील लेख
Show comments