1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. marathi kavita

खुप बोलायचं असतं..

खुप बोलायचं असतं,
पण मूक व्हावं लागतं,
प्रकट व्हायची वाटे भीती,
विचित्रच असते परिस्थिती,
पण गुंता वाढतो भावनिक,
घालमेल, चिंताच असते अधिक,
कसा मार्ग निघावा कळेना?
नक्की काय करावं ते उमजेना!
प्रश चिन्हांच जाळ भोवती,
अशीच राहील का ही स्थिती?
सुटायला हवं आहे सगळं,
मगच वाटेल हायस अन मोकळं!!
...अश्विनी थत्ते 
पुढील लेख
नकारात्मक विचार दूर होतील, नित्यकर्मात या गोष्टींचा समावेश करा