Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पु ल देशपांडे यांचे सुविचार

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (09:45 IST)
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, 
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो 
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
 
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, 
की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.
 
जगा इतके की आयुष्य कमी पडेल 
हसा इतके की आनंद कमी पडेल, 
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे 
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे.
 
शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.
 
परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे!.
 
प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे
 
जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.
 
जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
 
माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे…
 
आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे…
 
खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.
 
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.
 
आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.
 
खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते.
 
बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण.
 
सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
 
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
 
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
 
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो.
बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
 
रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments