Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरसुणी ठेवण्याचे नियम आवर्जून पाळावे नाही तर...

Updated: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (09:03 IST)
 
1 वास्तुशास्त्रानुसार, झाडू वर कधीही पाय ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी आई रागावून जाते आणि घरात दारिद्र्य येतं. झाडूचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे. 
 
2 घरात झाडू कधीही उलट्या बाजूने ठेवू नये. वास्तूच्या नियमानुसार, झाडू उलटी करून ठेवल्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात.
 
3 झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेवू नये, किंवा घराच्या गच्चीवर देखील ठेवू नये. वस्तू नियमानुसार झाडूला घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवल्याने घरात चोरी होण्याची भीती असते.
 
4 झाडू नेहमी लपवून ठेवावी. वास्तू विज्ञानाचा नियम आहे की झाडू अश्या जागी ठेवावी जिथून घराच्या किंवा बाहेरच्या लोकांना दिसू नये. त्यामागील कारण असे की पैसा लपवूनच ठेवला जातो, त्याला सार्वजनिक करत नाही. 
 
5 स्वयंपाकघर किंवा आपण जेवण करत असलेल्या जागेवर किंवा त्याचा जवळपास चुकूनही झाडू ठेवू नये. तसेच जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये. कारण वास्तुशास्त्रामध्ये हे अशुभ मानले जाते.
 
6 झाडू खराब झाली असल्यास नवी झाडू शनिवारीच घरात आणावी. हे शुभ मानले जाते. तसेच एखादे लहान मुलं एकाएकी घरात झाडू लावू लागत असेल तर आपल्या घरात पाहुणा येण्याची दाट शक्यता असते.
 
7 स्वप्नात आपल्याला कोणी झाडू घेऊन उभारलेले दिसल्यास हे शुभ सूचक आहे वास्तुशास्त्रात ह्याला सौभाग्याचे सूचक मानले जाते. अश्या लोकांचे नशीब बलवत्तर होतं.

सर्व पहा

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि गाणी का खेळली जातात? जाणून घ्या यामागील आरोग्यदायी व शास्त्रीय कारणे!

पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती वाहावी? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि मंत्र...

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Nag Panchami 2026 : नागपंचमीला शेतात काम किंवा भाजणे-कापणे का वर्ज्य मानले जाते? जाणून घ्या परंपरा आणि नियम!

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments