संबंधित माहिती
- मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, एक जण ठार तर एक गंभीर जखमी
- यवतमाळमध्ये होत होती गांजाची शेती आणि तस्करी; 5 जणांना अटक
- पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, 3 जणांचा मृत्यू
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस केली
- अटल सेतूवर चौथी आत्महत्या! 40 वर्षीय बँक मॅनेजरची समुद्रात उडी घेत आत्महत्या
ठाण्यातील चिप्स कंपनीला भीषण आग
महाराष्ट्रातील ठाण्यातील एका चिप्स कंपनीला बुधवारी भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट संकुलातील रामनगर भागात व्यंकट रमण स्पेशालिटी लिमिटेड या चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण आहे की त्यामुळे गॅस सिलिंडरचा देखील स्फोट झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. व आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत होते.
आग इतकी भीषण झाली आहे की या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने त्यांच्या घरांनाही आग लागण्याची शक्यता होती.
Edited By- Dhanashri Naik
