1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. BMC to cut water supply from July 1

तलावांमधील पाणीसाठा 7 टक्क्यांनी घटला, मुंबई महापालिका 1 जुलैपासून पाणीकपात करणार

Mumbai Municipal Corporation
पाणलोट क्षेत्रात अपुऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शनिवारपासून शहरातील 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे
.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही नागरिकांना पाण्याची बचत करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
 
मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि पुढील पाच दिवसांचा अंदाज पाहता पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
 
तलावांमध्ये 7.26 टक्के साठा शिल्लक आहे
मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी मिळते. बीएमसीच्या अहवालानुसार बुधवारी सकाळी 6 वाजता सात तलावांमध्ये 7.26 टक्के साठा होता. मागील वर्षी आणि 2021 मध्ये याच दिवशी तलावांमध्ये अनुक्रमे 9.04 आणि 16.44 टक्के पाणीसाठा होता.
पुढील लेख
वांद्रे-वर्सोवा सी-लिंक आता 'वीर सावरकर सेतू', अटल पूल झाला ट्रान्स हार्बर लिंक