संबंधित माहिती
- भारतावर कोणत्याही दहशतवादी कारवाईला युद्ध मानले जाईल,भारत सरकारने मोठा निर्णय घेतला
- ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 5 मोठे दहशतवादी ठार, यादी जाहीर
- मुंबईतील टाटा हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवण्यात आली
- IPL 2025: भारत पाकिस्तान तणाव दरम्यान BCCI चा मोठा निर्णय,आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलला
- भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त,सामना पुढे ढकलला
उद्यापासून मुंबईत फटाके फोडण्यावर आणि रॉकेट फोडण्यावर बंदी
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून मुंबईत फटाके फोडण्यावर आणि रॉकेट सोडण्यावर बंदी आहे. सीमेवरील वाढता तणाव आणि भारत-पाकिस्तान तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यास बंदी आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल.
भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे भारताचे काही जवान शहीद झाले आहे. दोन्ही कडून ड्रोन हल्ले सुरु आहे. या संघर्षाच्या स्थितीत मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षावर मुंबई पोलीस सक्रिय मोड आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी महत्त्वाचा आदेश काढला आहे. मुंबई पोलिसांनी उद्या 11 मे पासून 1 जून पर्यंत फटाके आणि रॉकेट फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व्या कलम 10 मधील पोटकलम 2 सह कलम 33 च्या पोटकलम 1 च्या खंडनुसार मुंबई पोलिसांनी शहरात फटाके, रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाची माहिती पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी, लाऊडस्पीकर, मेगाफोनवरून दिली जाणार आहे.
Edited By - Priya Dixit
