मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (11:02 IST)

मुबंईत मुसळधार पाऊस, पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

शनिवारी मुसळधार वार्‍यासह मुसळधार पावसाने मुंबई आणि आसपासच्या उपनगरास जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे बस आणि ट्रेन सेवा विस्कळीत झाली. हवामान खात्याने येत्या दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
 
मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाण्याची पातळी वाढल्यानंतर मुख्य मार्गावरील दादर आणि कुर्ला स्थानकांदरम्यान उपनगरी रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) अधिकाऱ्याने  सांगितले की काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक बसेस वळविण्यात आल्या
 
मध्य रेल्वेच्या एका अधिका-याने सांगितले की, कुर्ला ते सायन दरम्यान पाण्याची पातळी गेल्या एक तासामध्ये 61.21 मिमी पेक्षा जास्त पावसामुळे, दुपारी 1 :32 वाजता 4:34 मीटर उंच लाटा व मिठी नदीचे दरवाजे उघडल्यामुळे वाढत आहे. 
 
हार्बर मार्गावरील सेवा कमी केल्याने चुनाभट्टी स्थानकाजवळ जलसाठा झाला. सुरक्षेच्या कारणास्तव गाड्या कमी वेगाने धावत असल्याचे अधिकाऱ्याने  सांगितले. ठाणे-वाशीसह मुख्य मार्गावरील इतर विभागांवर तसेच अन्य मार्गावर लोकल गाड्यांचे परिचालन सामान्य आहे.
 
पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी
 
हवामान खात्याने (आयएमडी) शनिवारी सकाळी दहा वाजेपासून पुढील तीन तास मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे व विजांचा कडकडाट बजाविला होता. 'मुसळधार ते अति मुसळधार पाऊस' म्हणजेच ऑरेंज अलर्ट पुढील दोन दिवसांसाठी जारी करण्यात आला आहे. यापूर्वी शनिवारी आयएमडीने मुंबईसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला होता. ऑरेंज अलर्ट म्हणजे तीव्र हवामान परिस्थिती लक्षात घेता प्रशासन कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असावे.
 
21 जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दहा दिवसांत मुबलक पाऊस:
1 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रातील 36 पैकी 21 जिल्ह्यांमध्ये 60 टक्के जास्त पाऊस झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की 1 ते 10 जून दरम्यान या जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस झाला, जो या कालावधीच्या सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त आहे. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, रायगड आणि पालगड हे किनारपट्टी जिल्हा मुसळधार पाऊस पडलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. रत्नागिरी, बुलढाणा, नागपूर आणि भंडारा येथे अत्यधिक पाऊस पडला, तर आठ जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस झाला.
 
बुधवारी पावसाने दडी मारल्याने बसेसचे मार्ग सुमारे 30 ठिकाणी वळविण्यात आले. मुंबईच्या मुंब्रा, कोपर खैरणे, मोहाने, पनवेल, मालवणी वर्सोवा यासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. आपण सांगू की हा मान्सून  दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाला आहे . दक्षिण-पश्चिम मान्सून साधारणत: दरवर्षीच्या तुलनेत दोन दिवस आधी आला होता,अशी माहिती विभागाने दिली. पुढील तीन ते चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात शहरात एकूण 300 ते 350 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.