संबंधित माहिती
- मी देखील आई आहे, मुलगी गमावल्याचे दुःख मला समजते', दिशा सालियनच्या मृत्यूच्या अफवा पसरवू नका, किशोरी पेडणेकर यांनी हात जोडून सांगितले
- राज कुंद्रा केस: मुंबई क्राईम ब्रँचने इतर 4 आरोपींना अटक केली, शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप
- दिलासा, मुंबईत दोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांची संख्या शंभराच्या खाली
- पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी
- मुंबई हायकोर्टाचा लोकल प्रवाशांसाठी लससक्तीच्या आदेशावर राज्य सरकारला सवाल
नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात
नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट शहवासीयांवर आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 20 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र काही भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विभागवार आठवड्यातून एकवेळ संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून ऐरोली भागातून सुरू होणार आहे.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून आणि एमआयम्डीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मोरबेतून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण एमआयडीसीतून 80 दशलक्ष लीटरऐवजी 60 ते 62 दशलक्ष लीटर पुरवठा होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सुरळीत पाणी देण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
