संबंधित माहिती
- विरारजवळील राष्ट्रीय महामार्ग ४८ वर ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिली, वडील आणि मुलगा ठार
- कोटामध्ये टायर फुटल्याने अपघात, स्कूल व्हॅन आणि एसयूव्हीच्या भीषण टक्करीत दोन लहान मुलींचा मृत्यू
- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ वर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
- नवी मुंबई: घणसोलीजवळ ठाणे-बेलापूर उड्डाणपुलावर ट्रक उलटला
- कांदिवली येथील अग्रवाल रेसिडेन्सीला आग, 8 जण जखमी; आगीवर नियंत्रण
टिपर-बसच्या अपघातात 17 जण ठार
तेलंगणा मध्ये बस-टिपरच्या धडकेत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथील खानापूर गेटजवळ बस आणि टिपरच्या धडकेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच परिवहन मंत्री पन्नम प्रभाकर आणि केटीआर यांनी शोक व्यक्त केला आणि जखमींवर चांगल्या उपचारांचे निर्देश दिले.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात सुमारे १७ जणांचा मृत्यू, २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि तीन जण गंभीर जखमी आहे. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सकाळी चुकीच्या दिशेने येणारा टिप्पर ट्रक बसला धडकला तेव्हा हा अपघात झाला.
Edited By- Dhanashri Naik
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथील खानापूर गेटजवळ बस आणि टिपरच्या धडकेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच परिवहन मंत्री पन्नम प्रभाकर आणि केटीआर यांनी शोक व्यक्त केला आणि जखमींवर चांगल्या उपचारांचे निर्देश दिले.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात सुमारे १७ जणांचा मृत्यू, २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि तीन जण गंभीर जखमी आहे. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सकाळी चुकीच्या दिशेने येणारा टिप्पर ट्रक बसला धडकला तेव्हा हा अपघात झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेतीने भरलेला टिप्पर ट्रक चेवेल्लाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरासमोर धडकला. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा माल बसवर पडला. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अपघाताचे प्राथमिक कारण ट्रक चालक चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या चालकाची ओळख पटवली जात आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले.#UPDATE | Telangana Transport Minister Ponnam Prabhakar tells ANI, "Around 20 people died, around 20 are getting treatment in hospital, 3 are critically injured." https://t.co/2oaeWyzBEC
— ANI (@ANI) November 3, 2025