शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (17:35 IST)

अडीच वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून मृतदेहासोबत राहत होती, 9 महिन्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले

बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बंगळुरूच्या बयादरहल्ली भागात एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत अवस्थेत आढळले आहेत. यातील चार लोक लटकलेले आढळले, तर नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. प्राथमिक तपासामध्ये हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीच्या बुरारी घटनेच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत, जिथे दोन वर्षापूर्वी 11 मृतदेह एका घरात लटकलेल्या अवस्थेत सापडले होते.
 
अडीच वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून मृतदेहासोबत राहत होती
सांगितले जात आहे की अडीच वर्षांची मुलगी पाच मृतदेहांसह घरात पाच दिवसांपासून राहत होती, तिला आता बाहेर काढण्यात आली आहे. ती जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले आहे की लोक कसे मरण पावले, हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल.
 
मृतांमध्ये कोण होते?
मुलीची आई सिनचना- वय 34 वर्षे
मुलीची आजी भारती - वय 51 वर्षे
बाळाची काकू सिंधुराणी - 31 वर्षांची
बाळाचे मामा मधुसागर - वय 25 वर्षे
9 महिन्याचे बाळ
 
मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
पोलिसांना ती मुलगी त्याच खोलीत सापडली जिथे मधुसागर लटकलेला आढळला होता. सध्या मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला उपचार आणि समुपदेशनाची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) सौमेंदु मुखर्जी म्हणाले की, आम्हाला घरातून मृत्यूची चिठ्ठी मिळालेली नाही. घरातील वडील आणि मुलाचे आजोबा मधुसागर शंकर यांना धक्का बसला आहे. शंकरने सांगितले आहे की त्यांच्या मुली त्यांच्या पतींशी भांडण करून घरी आल्या. या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी आणि त्यांना त्यांच्या पतींकडे परत पाठवण्याऐवजी, त्यांची पत्नी भारती यांनी त्यांना परत राहण्यास प्रोत्साहित केले.
 
कुटुंबात भांडणे चालू होती
शंकर म्हणाले, "मी माझ्या मुली सिनचना आणि सिंधुराणी यांना शिक्षित करण्यासाठी खूप मेहनत केली. मुलगा मधुसागर हा सुद्धा इंजिनीअरिंग पदवीधर होता आणि एका खाजगी कंपनीत काम करत होता. सिनचना आपल्या मुलीचे कान टोचण्याच्या सोहळ्यावरुन तिच्या पतीशी भांडण करुन घरी आली. तिला कुठलीही आर्थिक समस्या नव्हती. क्षुल्लक कारणावरुन हे घातक पाऊल उचलले. "
 
शेजाऱ्यांनी पोलिसांना शंकर आणि त्यांचा मुलगा मधुसागर यांच्यात भांडण झाल्याची माहिती दिली. मारहाणीनंतर शंकर घराबाहेर गेला होता. या घटनेनंतर कुटुंबाने रविवारीच आत्महत्या केली. मृतदेह विस्कटलेल्या अवस्थेत सापडले असून फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू पाच दिवसांपूर्वी घडले.