Dharma Sangrah

शहिदांना धर्म नसतो : अनबू

Updated: गुरूवार, 15 फेब्रुवारी 2018 (09:32 IST)
 
ओवेसी यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केले होते. सुंजवानधील हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण काश्मिरी मुसलामान होते. जे लोक मुसलमानांना आजही पाकिस्तानी समजतात, त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे, असे ओवेसी म्हणाले होते. 
 
काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप दोघेही सत्तेत बसून नाटके करत असून सत्तेची मलई खात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.
 
ओवेसी यांच्या या वक्तव्याचा त्यांचे नाव न घेता देवराज यांनी समाचार घेतला. शत्रूंना नैराश्य आले आहे. जेव्हा ते सीमेवर असतात तेव्हा ते लष्कराच्या तळावर हल्ला करतात, असे सांगतानाच देशाच्या विरोधात जेकोणी उभे राहतील ते आमच्यासाठी अतिरेकीच असून आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशाराही देवराज यांनी दिला.
 
माझ्या घरातही एक धार्मिक स्थळ असून तिथे सर्व धर्मांची प्रतीके आहेत. ज्या लोकांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते अशा प्रकारची विधाने करतात, असेही त्यांनी सांगितले. तरुणांचे दहशतवाद्यांकडे आकर्षित होणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगतानाच, सोशल मीडियामुळेच तरुण दहशतवादाकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments