दुचाकींबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवीन बाईक खरेदी केल्यावर हेल्मेट मिळणार
दुचाकी वाहनांच्या सुरक्षेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दुचाकी उत्पादकांना वाहन खरेदी करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. देशभरातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सरकारच्या सततच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे देशातील रस्ते अपघातांमध्ये घट होईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा नवीन नियम लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याअंतर्गत, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989मध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या प्रस्तावित अधिसूचनेनुसार, दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा नवीन नियम घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन (सुधारणा) नियम, 2025 सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत, दुचाकी खरेदी करताना, दुचाकी उत्पादकाला भारतीय मानक ब्युरोने निश्चित केलेल्या मानकांनुसार दोन संरक्षक हेल्मेट प्रदान करावे लागतील
हेल्मेट तरतुदीव्यतिरिक्त, सरकारने आणखी एक सुरक्षा उपाय प्रस्तावित केला आहे. 1 जानेवारी 2026 पासून, सर्व नवीन L2 श्रेणीतील दुचाकी, ज्यामध्ये 50 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता किंवा 50 किमी/ताशी पेक्षा जास्त वेग असलेल्या मोटारसायकली आणि स्कूटरचा समावेश आहे, त्यांना अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह येणे आवश्यक असेल. यामुळे अचानक ब्रेक लावताना स्किडिंगची शक्यता कमी होईल.
या नवीन नियमांनुसार, मंत्रालयाने सार्वजनिक सूचनांसाठी 30 दिवसांचा वेळ दिला आहे. या काळात, नागरिक किंवा भागधारक त्यांच्या सूचना किंवा आक्षेप पाठवू शकतात.सरकारने घेतलेला हा निर्णय दुचाकी चालकांसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरेल. यामुळे दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.
Edited By - Priya Dixit