संबंधित माहिती
- पश्चिम रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद ते राजस्थानसाठी तीन जोडी उन्हाळी विशेष गाड्या चालवणार, जाणून घ्या वेळापत्रक.
- मुंबई ते थिवीम स्थानकादरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
- मध्य रेल्वेच्या चाळीसगाव येथे तीन दिवस मेगाब्लॉक, दहा प्रमुख रेल्वे रद्द
- 20 rupees food in train चालत्या रेल्वेमध्ये Whatsapp वर बुक करा स्वस्त जेवण, IRCTC ची रेल्वे प्रवाशांसाठी ऑफर
- बरौनी-ग्वाल्हेर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची माहिती
वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार
गाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय वाचवण्यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, रेल्वेने निर्णय घेतला आहे की सर्व वंदे भारत ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला 500 मिली ची एक रेल नीर पॅकेज्ड पेयजल (PDW) बाटली दिली जाईल. याशिवाय, मागणीनुसार 500 मिलीची आणखी एक रेल नीर PDW बाटली प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता दिली जाईल.
यापूर्वी ट्रेनमध्ये एक लिटर पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या. बहुतांश प्रवासी एक लिटरही पाणी वापरत नसल्याचे अनेकदा दिसून आले. या कारणास्तव आता एक लिटर पाणी दोन भागात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवास सुरू होताच प्रवाशांना 500 मि.ली. बाटली दिली जाईल. यानंतर त्याला गरज पडल्यास व मागणी केल्यास 500 मि.ली. त्यांना आणखी एक पाण्याची बाटली देण्यात येणार आहे.
Edited By- Priya Dixit