शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (20:33 IST)

मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशात हाहाकार

रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि आंध्र प्रदेशातील एका दक्षिण किनारपट्टीत 20 सेमीपर्यंत मुसळधार पाऊस झाला.यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून बर्यातच लोकांचा मृत्यू झाला असून 100 लोक बेपत्ता आहेत. तिरुपतीहून समोर येत असलेल्या चित्रांमध्ये शेकडो यात्रेकरू भीषण पुरात अडकल्याचे दिसत आहे. घाट रोड आणि तिरुमला हिल्सचे रस्ते बंद आहेत. तिरुपतीच्या हद्दीतील स्वर्णमुखी नदीला पूर आला असून जलकुंभ भरून गेले आहेत. अनेक लोक पुरात अडकल्याचे वृत्त आहे. हवाई दल, SDRF आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अचानक पुरात अडकलेल्या अनेकांना वाचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
 
मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री शनिवारी पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करतील. वाढत्या नद्या आणि कालव्यांमुळे अनेक जिल्ह्यांना पूर आला आहे, रस्ते खराब झाले आहेत आणि काही ठिकाणी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलीपिरी ते तिरुमला या टेरेस्ड रस्त्याचे भूस्खलन आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले असून तो बंद करण्यात आला आहे.